सत्ता आली नाही तरीही मा आ अमरसिंह पंडित यांची गेवराईत शक्ती’ वाढली
पंडित – पवार एकत्र तरीही एकाचे चार नगर सेवक
गेवराई दि २३ ( वार्ताहार ) गेवराई नगर परिसदेत गत तिन दशका पासून पवार परिवाराची एकहाती सत्ता होती नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत पवारांचे पॅनल जरी विजयी झाले असले तरी त्यांना माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या साथीने नगर पालिकेचा विजय मिळवता आला हे पण तेवढंच बरोबर आहे विधानसभेला गेवराई शहरात आ विजयसिंह पंडित यांना ६ हजार मते मिळाली होती परंतू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीतून मा आ अमरसिंह पंडित यांना गेवराईत मोठी ताकद मिळाली असून २ हजार पेक्षा जास्तीचे मते मिळाली आहेत ते पण स्वबळावर एकेकाळी १ नगर सेवक असनाऱ्या मा आ अमरसिंह पंडित गटाला गेवराई शहरात ४ नगर सेवक मिळाले आहेत आणि सक्षम पवारांना विरोधीगट तयार झाला असल्याची परिस्थिती आहे.
याबाबद सविस्तर माहिती की,गेवराई नगर परिषदेच्या निवडणूक रणघूमाळीत अनेक घटना गेवराई शहरात घडल्या ( दि २१ ) रोजी निकालही पार पडला सगळ्या उमेदवार यांनी तो निकाल मान्यही केला परंतू या निवडणूकीतून एक वास्तव समोर आले आहे ते नाकारून चालणार नाही ते म्हणजे गेल्या तिस वर्षापासून गेवराईच्या पवार परिवाराची एकहाती सत्ता आणि स्वबळावर होती कुणाचाही राजकीय सपोर्ट त्यांना नव्हता परंतू काल झालेल्या नगर परिषद निवडणूकीचे श्रेय एकट्या पवारांना नाही तसेच माजी मंत्री बदामराव पंडित यांचा यामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे भाजपच्या पॅनल वर झालेली निवडणूक पवारांच्या सत्तेवर जरी गेली असली तरी गेवराई शहरात मा आ अमरसिंह पंडित किंगमेकरच ठरले आहेत कारण त्यांनी कुनाचाही पाठिंबा न घेता पक्षाच्या झेंडा हाती घेऊन स्वबळावर गेवराई शहरात निवडणूक लढविली आणि ४ नगर सेवक निवडणून आनले आणि सौ. शितलताई दाभाडे यांच्या रूपाने ८ हजार पेक्षा जास्त मते मिळवली आहेत.जिथं गेवराईत मा आ अमरसिंह पंडित यांना गेवराईत कार्यकर्ते नाहीत असे म्हणणारे लोक तोंडघशी पडले असून या निवडणूकीत एकाचे ४ झाले अन् गेवराईत मा आ अमरसिंह पंडित यांची मोठी ताकद निर्माण झाली आहे मात्र तेवढंच बरोबर आहे राजकीय जानकार यांच्यात ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...