गेवराई दि १३ ( वार्ताहार )तालुक्यातील राक्षभूवन परिसरात वाळूसाठा जप्त असल्याचे भासवून त्यांचा लिलाव करूण परत गोदापात्रातून वाळू उपसा करण्याची परवानगी देण्याचा मानस गेवराईचे तहसिदार संदिप खोमणे यांचा आहे तसेच याठिकाणी वाळू देखील नसल्याची माहिती आहे तर लिलाव कश्याचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे .
याबाबद सविस्तर माहिती अशी की , गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन तसेच बोरगांव ( बू ) असे दोन्ही ठिकाणी मिळून ४५५ ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव करण्याचा डाव गेवराई तहसिलदार यांचा आहे परंतू याची जाहिरात आणि सदर ठिकाणी वाळू साठा नाही अशी तक्रार गेल्यानंतर आज ( दि १३ जूलै ) रोजी यांची जाहिरात एका स्थानिक वृत्तमान पत्रात आली आहे तसेच याठिकाणी वाळू नाही हे माहित असतांना देखील तहसिलदार यांनी केवळ आपला खिसा गरम करण्यासाठी सदरचा वाळू साठ्याचा लिलाव उद्या ( दि १४ जूलै ) रोजी ठेवण्यात आला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून सदरचा लिलाव रद्द करावा अशी मागणी होऊ लागली आहे .तसेच या प्ररकरणी गेवराईचे तहसिलदार यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...