वाळूच्या अवैध तस्करीमुळे बुडतोय कोट्यावधींचा महसूल पोलिसांच्या अहवालाने महसुलचे पितळ उघडे

बीड दि. २ ( वार्ताहार ) : बीड जिल्ह्यात वाळूची तस्करी होत असल्याच्या ढिगाने तक्रारी होत असल्या तरी महसूल प्रशासन मात्र अशी तस्करी होत असल्याचे कधी मान्य करीत नाही, अगदी विधिमंडळाला देखील तस्करी होत नसल्याचे सांगितले जाते. मात्र आता खुद्द पोलीस अधीक्षकांनीच जिल्ह्यात अशी वाळूची तस्करी होत असून त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचा गोपनीय अहवाल पाठविल्याची माहिती आहे.. स्वतः पोलीस अधीक्षकांनीच असा अहवाल दिल्याने आता महसूल विभागाचे पितळ उघडे पडले आहे.

मोठ्याप्रमाणावर वाळू तस्करी लावण्याचे काम आतापर्यंत महसूल विभाग करीत आला बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि गेवराई तालुक्यात वाळू तस्करी हा नित्याचा विषय आहे. जिल्ह्यातील मोठी अर्थव्यवस्था या तस्करीवर अवलंबून आहे. या वाळू तस्करीला राजकीय आणि प्रशासकीय आशीर्वाद असल्याने ही तस्करी जोरात अगदी लोकप्रतिनिधींनी तक्रारी मोठ्याप्रमाणावर तस्करी होत आहे. मागच्या काही काळात जिल्ह्यातील गोदापट्यात होत असल्याच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत. या वाळू आहे. तस्करीमुळे अनेक बळी देखील गेले आहेत. मात्र प्रत्येकवेळी महसूल प्रशासनाने कानावर हात ठेवण्याचीच भूमिका घेतली आहे. केल्यानंतरही कागदी घोडे नाचवून त्याला वाटाण्याच्या अक्षता आतामात्र पोलिसांनीच महसूल विभागाचे पितळ उघडे पडले आहे. जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई तालुक्यात बाळूची आहे आणि यामुळे शासनाचा कोट्यावधींचा वाळूच्या अवैध तस्करीमुळे महसूल बुडत आहे असा अहवाल दस्तुरखुद्द पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनीच पाठविल्याची सूत्रांची माहिती आहे. मागील आठवड्यात पोलीस अधीक्षकांनी हा गोपनीय अहवाल पाठविल्याची माहिती असून या अहवालामुळे महसूल विभागाचा बाळू तस्करी होत नसल्याचा कांगावा उघडा पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *