चोविस तासांत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

गंगावाडीच्या ग्रामस्थांसह ठेकेदाराची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

गेवराई दि ६ ( वार्ताहार ) तालुक्यातील गंगावाडी या ठिकाणी सुरू असलेला वाळू ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी गंगावडी ग्रामस्थ व स्थानिक आमदार यांनी जल आंदोलन करण्यात आले होते तसेच सदरचा वाळू ठेका नियमबाह्य असल्याने रद्द करण्यात यावा ही मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी गांवकऱ्याला दोन दिवसांत वाळू ठेका रद्द करण्यात येईल असे अश्वासन दिले होते. त्या अनुषगाने जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन त्री समिची नेमणूक केली असुन चोविस तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , गंगावाडी वाळू ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी आज ( दि ६ जून ) रोजी जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित केली होती या बैठकीत , अप्पर जिल्हाधिकारी तूषार ठोंबरे , अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार , प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीराम भेंडे , तहसिलदार सचिन खाडे यांची उपस्तीथी होती , तसेच बैठक सुरू करण्यापुर्वी गंगावाडी येथील काही ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून वाळू ठेका सुरू करा म्हणून लेखी निवेदन सादर केले आहे तसेच वाळू ठेकेदार यांनी देखील गावांतील सरपंच व ईतर दोन लोकांनी २० लाखं रुपये मागितले व पावत्या मागितल्या ते जर दिले नाहीतर आ लक्ष्मण पवार यांना सांगून सदरचा वाळू ठेका बंद करू अशी धमकी दिली असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे .तसेच ठेकेदार व गंगावाडी येथिल ग्रामस्थ यांच्या तक्रारीत देखील हाच मूद्दा उपस्थित केला आहे म्हणून सदरच्या जल आंदोलनावर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे तसेच या प्रकरणी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी चोविस तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन या त्री समितीमध्ये प्रभारी उपविभागीय अधिकारी श्रीराम भेंडे , बीडचे तहसिलदार सुहास हजारे , गटविकास अधिकारी डॉ सचिन सानप यांचा समावेश असुन या त्री समितीच्या अहवाला नंतर या ठेक्यावर काय ? कार्यवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *