विजेचा धक्का लागून दोनजन मयत प्रकरणी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर
तहसिलदार संदिप खोमणे यांनी घटनास्तळाची केली पाहणी
गेवराई दि 28 ( वार्ताहार ) तालुक्यातील मारफळा शिवारात विजेचा धक्का लागून पिता पुत्राचा जागिच मृत्यू झाला असल्याची घटना ( दि 26 मे ) रोजी घडली होती तसेच सदर ठिकाणी गेवराईचे महसूल प्रमुख यांनी आपल्या पथकासह भेट दिली व या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती मंडळ अधिकारी परमेश्वर सानप यांनी दिली आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई महसूल मंडळात गेल्या दोन दिवसापासुन सतत अवकाळी पाऊस पडत आहे तसेच गोठाकाठच्या व सर्व शेतकरी बांधव यांच्यासह नागरिकांनी सर्तकता बाळगण्याच्या सुचना प्रशासनाच्या वतिने वेळोवेळी देण्यात येत आहेत तसेच मारफळा याठिकाणी अभिमान लक्ष्मण कबले ( वय 38 वर्ष ) व ज्ञानेश्वर अभिमान कबले ( वय 19 वर्ष ) दोन्ही राहणार मारफळा तालुका गेवराई जिल्हा बीड हे दोघे पिता पुत्र यांना विद्यूत धक्का लागल्याने जिव गमवावा लागला आहे तसेच सदर ठिकाणी गेवराईचे महसूल प्रमुख तहसिलदार संदिप खोमणे यांनी आपल्या पथकासह भेट देऊन घटनास्तळाचा पंचनामा केला आहे व पिडित कुटूंबियाची भेट घेतली असून सदर प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला असून असल्याची माहिती मंडळ अधिकारी परमेश्वर सानप यांनी दिली असून अवकाळी पावसामुळे होणाऱ्या हनीपासून नागरिकांनी सतर्क राहून धोका टाळावा व शासनाने सांगितलेल्या सुचनाचे पालन करावे असे अवहान गेवराई महसूल च्या वतिने करण्यात आले आहे.
भाऊसाहेब डावकर यांनी शाळेला संगणक तर परमेश्वर सोळंके यांच्याकडून शेतकऱ्यांना बीयाणे वाटप विविध उपक्रमांनी अमरसिंह पंडित यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...
धर्मवीर संभाजीराजे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज पंडित गेवराई दि.8 (वार्ताहार) गेवराई शहरातील छत्रपती संभाजीराजे मित्र मंडळच्या वतीने आज छत्रपती...