महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्यावर मतदारांचा बहिष्कार;बौद्ध समाजाच्या स्मशान भूमिचा वाद
समाजातील सुज्ञ मतदांरानी बदामराव पंडित यांना मतदान करू नये – विनोद सौंदरमल
गेवराई दि 7 ( वार्ताहार ) शहरातील बीड जालना रोडवर असनाऱ्या बौद्ध समाजाची स्मशान भूमि आहे तिन पीड्या पासून ही स्मशानभूमि अस्तिवात आहे सन 2007 पासून जिल्हा सत्र न्यायालयात या स्मशान भूमिचा वाद सुरु या जागेवर महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार माजी मंत्री बदामराव पंडित यांना दावा केलेला आहे म्हणून होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत माजी मंत्री यांना बौद्ध समाजातील सुजान नागरिकांनी मतदान करू नये असे अवाहन माजी नगर अध्यक्ष विनोद सौंदरमल यांनी केले आहे.
याबाबद सविस्तर माहिती अशी की,गेवराई शहरात बीड जालना रोडवर बौद्ध समाजाची स्मशान भूमि आहे ही अनेक वर्षापासून आहे याठिकाणी अंत्यसंकार केले जातात परंतू या जागेवर माजी मंत्री बदामराव पंडित यांनी दावा केलेला आहे त्यामुळे या जागेचा सार्वागिन विकास आत्तापर्यंत झालेला नाही आणि ही स्मशान भूमि विकासापासून वंचित राहिलेली आहे 2007 पासून यांचा वाद बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे याजागेवर दावा करनाऱ्या महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यावर राजकीय बहिष्कार बौद्ध समाजाने घातला आहे तालूक्यातील बौद्ध समाजातील नागरिकांनी,महिलांनी,युवकांनी त्यांना मतदान करू नये असे अवाहन माजी नगर अध्यक्ष विनोद सौंदरमल यांनी केले आहे.
लोकशाहीचा अर्धवट उत्सव: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वनवास. [दर्पणदिन विषेश ] भारतीय लोकशाहीच्या सुदृढ वाटचालीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारइतकेच...