तलवाड्यात खून का बदला खून?

एकाची चाकूने भोसकून हत्या

 

गेवराई दि 3 ( वार्ताहार ) तालुक्यातील तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत एक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे तसेच आपल्या लहान मुलांचा खून करणाऱ्याच्या मुलाची निर्घून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने तलवाडा परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून आज ( 3 सप्टेंबर ) रोजी दूपारी चार वाजण्याच्या सुमारास पाढंरवाडी याठिकाणी ही घटना घडली आहे.

याबाबद सविस्तर माहिती अशी की,बालाजी भगवान गडबडे ( वय 26 वर्ष ) राहणार पाढंरवाडी तालूका गेवराई जिल्हा बीड असे मयताचे नाव आहे तसेच यांची हत्या करण्यात आली आहे मयताचे वडिल नामे भगवान गडबडे यांच्या विरूद्ध तलवाडा पोलिसांत दोन बालकांना उंदिर मारणाचे औषध देऊन ठार मारले असल्याचा गून्हा दाखल आहे आणि आता भगवान गडबडे यांच्या मुलांची हत्या ही अमोल सुखदेव भावले यांनी व त्यांच्या साथीदाराने केली असल्याचा प्राथमिक अंदाज  आहे तसेच याने आपल्या लहान मुलांच्या खूनाचा बदला घेतला असल्याची चर्चा या परिसरात आहे तसेच तलवाडा पोलिस ठाणे हद्दीत पाढंरवाडी शिवारात एकाची चाकूने भोसकून हत्या झाली असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्तळी हजर झाले व मयताला शवविछेदना साठी बीड जिल्हा रूग्णालयात हलवले आहे तसेच या खून का बदला खून ?या घटनेमुळे तलवाडा परिसरात खळबळ उडाली आहे.तसेच आरोपीच्या शोधार्थ तलवाडा पोलिसांचे पथके रवाना झाली असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.तसेच खूनाचा गून्हा दाखल करण्यास तलवाडा पोलिसांनी टाळाटाळ केली असल्या कारणाने मयताचे नातेवाई यांनी पोलिस अधीक्षक यांच्या दालना समोर अक्रोश केला 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *