गेवराई दि २५ ( वार्ताहार ) नुकतीच देशाच्या सर्वोच्च पदाची राष्ट्रपती पदाची निवडणुक झाली या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात आले, याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यासह देशभरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या निवडणूका बॅलेट पेपरवरच घ्याव्यात यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्य निवडणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांना निवेदनद्वारे मागणी केली.