पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द;शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बीड दि. १७ ( वार्ताहार ) : पीक विमा ‘भरण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद सक्तीची करण्यात आली होती. मात्र ई पीक पाहणी ऑगस्ट नंतर नोंदविली जात असल्याने त्याचा परिणाम पीक विमा भरण्यावर होत होता. आता अखेर शासनाने ती अट रद्द केली आहे. यामुळे पीक विमा भरु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्यात सध्या खरीपाच्या पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. ३१ जुलै ही पीक विमा भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात पीक विमा योजनेत काही शेतकऱ्यांनी बोगसगिरी केल्यामुळे पीक विमा भरण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद सक्तीची करण्यात आली होती. असे असताना पीक पाहणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण होते आणि पीक
विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे. अशा परिस्थितीत पीक विमा भरायचा कसा अशी अडचण अनेक शेतकऱ्यांसोबत निर्माण झाली होती. ई. पीक पाहणीची ही अट रद्द करावी अशी मागणी विविध संघटनांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता पीक विम्यासाठी ई पीक पाहणीची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पीक विमा भरणाऱ्यांच्या संखेत निश्चितपणे वाढ होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- आ.विजयसिंह पंडित तुळजाभवानी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न गेवराई दि 24 (वार्ताहर) तुळजाभवानी...
परमेश्ववर सातपुते यांच्यावर पक्षाकडून मोठी कार्ययाई बीड दि15 ( वार्ताहार ) अखेर जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आलेले...
सामान्य जनतेत काम करणाऱ्यांना पक्ष संघटनेत प्राधान्य देवू - अमरसिंह पंडित जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत गेवराईत सदस्य नोंदणीचा शुभारंभ...