बीड दि. १७ ( वार्ताहार ) : पीक विमा ‘भरण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद सक्तीची करण्यात आली होती. मात्र ई पीक पाहणी ऑगस्ट नंतर नोंदविली जात असल्याने त्याचा परिणाम पीक विमा भरण्यावर होत होता. आता अखेर शासनाने ती अट रद्द केली आहे. यामुळे पीक विमा भरु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.