April 19, 2025

ऊसाला आग लाऊन शेतकऱ्यांची आत्महत्या

गेवराई तालुक्यातील हिंगणगाव याठिकाणची घटना

गेवराई दि ११ ( वार्ताहार ) तालुक्यातील हिंगणगाव येथील एका शेतकरी यांने ऊस जात नसल्या कारणाने ऊसाला आग लावून आत्महत्या केली असल्यांची घटना तालुक्यातील हिंगणगाव याठिकाणी घडली आहे .

या बाबत सविस्तर माहिती अशी की , नामदेव आसाराम जाधव ( वय ३२ वर्ष ) राहनार हिंगणगाव तालुका गेवराई जिल्हा बीड असे या शेतकरी यांचे नाव असुन आज ( दि ११ रोजी ) दूपारी बारा वाजण्याच्या सुमारास या शेतकरी याला संपुर्ण दिड एकर जमिन आहे त्यापैकी एक एकरमध्ये ऊसाचे क्षेत्र आहे ऊस जात नसल्यामुळे नैराशातून या शेतकऱ्यांने आधी ऊसाला आग लावली व त्यानंतर त्याठिकाणीच लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली असुन या शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज असल्याची प्राथमिक माहिती आहे घटना स्तळावर गेवराई पोलिसांनी धाव घेतली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *