स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा व स्वच्छता नियमित न केल्यास तिव्र आंदोलन – कांबळे, गुंजाळ

                                                     गेवराई दि. ०५ (वार्ताहर)

गेवराई शहरातील संजय नगर भागातील गेल्याव कित्येक महिन्यां पासुन पोलवरील स्ट्रीट लाईट ची देखभाल दुरुस्तीस न केल्या्मुळे बंद पडल्यास आहेत. याचा अनेकांना नाहक त्रास होत आहे तसेच या भागातील पाणी पुरवठा कमी दाबाने व वेळेवर होत नाही तसेच दुषीत पाणी येत आहे. तरी या भागातील नगरसेवक यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या परंतु ते दखल घेत नसल्यााने याप्रकरणी वरील बाबींची नगर परिषद प्रशासनाने दखल न घेतल्यातस आंदोलन करण्यालत येईल असा ईशारा राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष गुंजाळ व मयुर कांबळे यांनी दिला आहे.

वरिल विषयी गेवराई नगर परिषदेला लेखी निवेदन सादर करुन संजय नगर भागातील पोलवरील स्ट्रीट लाईट, होत असलेला दुषीत पाणी पुरवठा तसेच परिसरात वेळेवर नालेसफाई न केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्ये पसरले असुन डासांचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम नागरिकांच्या व लहान मुलांच्याय आरोग्याकवर होत आहे. वेळेवर नालेसफाई करुन जंतुनाशक पावडर मारण्यात यावे. नगर परिषद प्रशासनाच्याा जाणिवपुर्वक दुर्लक्षामुळे याचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना भोगावा लागत असल्याने येत्या काळात वरील मागण्या नगर परिषदेने पुर्ण न केल्यास नगर परिषदेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्या्त येईल अशा ईशारा राष्ट्र वादी कॉंग्रेसचे नेते सुभाष गुंजाळ व मयुर कांबळे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *